Header Ads

Header ADS

सांगली जिल्ह्यात 3 लाख 84 हजार हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामाचे नियोजन- जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी


 

सांगली दि 27  : खरीप हंगाम 2021-22 करिता सांगली जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाचे नियोजन जिल्ह्यात  तीन लाख 84 हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. यामध्ये भात 17400 हेक्टर, ज्वारी 50600 हेक्टर, बाजरी 56 हजार हेक्टर, मका 37 हजार 100 हेक्टर, कडधान्य 29 हजार 600 हेक्टर,सोयाबीन 59 हजार हेक्टर, व भुईमूग 32 हजार 200 हेक्टर  व ऊस 1 लाख 04 हजार 215 हेक्टरचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली आहे.

 एक लाख 42 हजार 160 मेट्रिक टन खताची मागणी पैकी आज अखेर 62 हजार 318 मेट्रिक टन खत प्राप्त झाले आहे. युरिया 17561 मेट्रिक टन डीएपी 4743 मेट्रिक टन सात हजार 252 मेट्रिक टन एसएससी आठ हजार 434 मेट्रिक टन व एनपीके 24 हजार 328 मेट्रिक टन खताचा पुरवठा एप्रिल व मे मध्ये झालेला आहे. सांगली जिल्हा करता खरिपात 4565 मेट्रिक टन बफर स्टॉक करण्यात येणार असून आज अखेर अडीच हजार मेट्रिक टन बफर स्टॉक केले आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार खताच्या दरा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती परंतु केंद्र शासनाने खता करिता ज्यादा अनुदान घोषित करून खताच्या  किमती नियंत्रित केले असून शेतकऱ्यांना सुधारित कमी झालेल्या किमती नुसार सुधारित दराने खत उपलब्ध व्हावे याकरिता जिल्ह्यामधील सर्व खत कंपनी प्रतिनिधी व खत वितरकांना ऑनलाईन बैठक घेऊन सप्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.जर कोणी जादा दराने खताची विक्री केली तर संबंधितांचा विक्री परवाना निलंबित करून कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या आहेत. 

जिल्ह्यात खताचे होलसेल व रिटेल असे एकूण 3175 वितरक आहेत. जिल्ह्यामध्ये 15 एप्रिल 2021 पासून  सहा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. निविष्ठा गुणनियंत्रण कामकाजासाठी जिल्ह्यात 32 गुणनियंत्रण निरीक्षक व अकरा भरारी पथका मार्फत निविष्ठा वितरकांचे तपासणी व बियाणे खते औषधे नमुने काढण्याची कारवाई करण्यात येत आहे.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जे वितरक विहित कालमर्यादेत परवाना नुतनीकरण केलेले नाहीत व जादा दराने खत विक्री करत आहेत अशा परवानाधारक त्यांचे 33 परवाने निलंबित करण्यात आले आहेत व त्यांना नोटीस बजावून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे यामध्ये मिरज 2, वाळवा 10 ,शिराळा 2, खानापूर 2,तासगाव 7 ,कडेगाव पलूस आटपाडी प्रत्येकी एक, कवठेमंकाळ 3 व जत 4

जिल्ह्यामधील सर्व निष्ठा वितरकांची तपासणी करण्यासाठी दिनांक 29 व 30 मे रोजी मोहीम स्वरूपात सर्व भरारी पथकामार्फत तपासणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात कुठेही जादा दराने निविष्ठा विक्री किंवा खतांची विक्री होत असेल तर शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी तसेच जिल्हा स्तरावर सहा नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क साधून तक्रारीची नोंद करावी असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.


No comments