Header Ads

Header ADS

*महे येथे रानटी प्राण्यांकडून २० बकऱ्यांचा फडशा* सुमारे दिड लाखाचे नुकसान : आठवड्यातील चौथी घटना





प्रथमेश वाडकर :बालिंगा : प्रतिनिधी, करवीर तालुक्यातील महे येथील कृष्णात भागोजी पुजारी.या मेंढपाळ धनगराच्या २० कोकरांचा ( बकरी) रानटी प्राण्यांनी फडशा पाडला,  यामध्ये या गरीब मेंढपाळाचे सुमारे दीड लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान याच तालुक्यातील सावरवाडी, खुपिरे व कांडगाव पाठोपाठ या आठवड्यातील ही चौथी घटना घडली असून धनगर समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 
 महे येथील नवाळे मळा नावाच्या शेतीमध्ये कृष्णात पुजारी यांची बकरी बसण्यास होती. मंगळवारी ( दि. ८ ) सकाळी बकरी चरण्यासाठी गेल्यानंतर तळावर लहान पिले ( कोकरी ) डालून ठेवण्यात आली होती. परंतु तळावर कोणी नसल्याने अज्ञात रानटी प्राण्यांनी या कोकरांवर हल्ला केला. यामध्ये एक मयत असून ११ पिल्याना गंभीर जखमी केले आहे. तर ८ पिली गायब आहेत.  यामध्ये पुजारी यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 
मेंढपालांनी ही घटना *धनगर समाजाचे नेते व मल्हारसेना सरसेनापती बबनराव रानगे यांना कळवली,* तात्काळ  बबन रानगे. यांनी घटनास्थळी येऊन वन विभागासह जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला कळविले, करवीरचे वनपाल विजय पाटील, करवीरचे वनरक्षक रुपेश मुल्लानी राहुल जोधवाल, डॉ, वाळवेकर व जि प चे डॉ इंगळे हेही घटनास्थळी दाखल झाले. भर पावसात रात्री उशिरापर्यंत रानगे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
 यावेळी सरपंच सज्जन पाटील, उपसरपंच रुपाली बोराटे, शाहीर युवराज पुजारी, बळीराम लांडगे, युवराज बोराटे, दत्ता बोडके, दत्तात्रय हराळे व बाबूराव शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 
 चौकट
 *मदतीसाठी पाठपुरावा करणार*
*एका आठवड्यात अशा स्वरूपाच्या सलग चार घटना घडल्या आहेत.* *धनगर समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे.  रानटी प्राण्याकडूनच घडलेल्या या. घटनेमुळे मेंढपालांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,*  *नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी सांगितले.*

No comments