Header Ads

Header ADS

जिल्ह्यातील 2 बंधारे पाण्याखालीराधानगरीतून 1400 क्युसेक्सचा विसर्ग

 कोल्हापूर, दि. 19  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 222.31 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे एकूण 2 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  राधानगरी-222.31 तुळशी -96.48, वारणा -885.08, दूधगंगा-655.44, कासारी- 66.95, कडवी -71.24 (पूर्ण क्षमतेने भरला), कुंभी-67.34, पाटगाव 97.32, चिकोत्रा- 41.85, चित्री - 53.12 (पूर्ण क्षमतेने भरला),  जंगमहट्टी -32.80, घटप्रभा 32.49, जांबरे- 23.23(पूर्ण क्षमतेने भरला), आंबेआहोळ - 30.98 इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

          तर बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे -राजाराम 15.1 फूट, सुर्वे 17.10, रुई 42.9, इचलकरंजी 39.9, तेरवाड 38.6, शिरोळ 30  तर नृसिंहवाडी  बंधाऱ्याची  27 फूट इतकी पाणी पातळी आहे.

No comments