सायंकाळी 4 वाजेपर्यंत 20 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 78.80 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील एकूण 20 बंधारे पाण्याखाली आहेत.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी व सरकारी कोगे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- मांडूकली व शेणवडे असे 20 बंधारे पाण्याखाली आहेत.
00000
No comments